Breaking News

किटकनाशक फवारणीमुळे सिन्नरच्या महिलेचा मृत्यू

नाशिक, दि. 28, ऑक्टोबर - राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातील शेतांत किटकनाशक फवारणीमुळे 22 शेतकर्‍यांचे मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच आता हे लोन नाशिक  जिल्ह्यातही आले आहे. आज दुपारी किटकनाशक फवारणीमुळे केशरबाई लक्ष्मण गायकवाड (वय 55) रा. मुसळगाव, ता. सिन्नर या महिला शेतकर्‍याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक  माहिती आहे.
फवारणीनंतर त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने दुपारी आडगाव येथील वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी आडगाव  पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली असून त्या किटकनाशक फवारणीमुळे मृत्यूमुखी पडल्याच्या घटनेला पोलिसांनी दुजोरा दिला आहे. दरम्यान विषारी औषध चेहर्‍यावर उडाल्याने  त्यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अहवालात म्हटले आहे.