Breaking News

पूर्व वैमनस्यातून दोघांवर प्राणघातक हल्ला; 15 जणांविरूद्ध गुन्हा

ठाणे, दि. 23, ऑक्टोबर - पूर्व वैमनस्यातून 2 तरूणांवर बाटलीने वार करत प्राणघातक हल्ला केल्याची घटना अंबरनाथमध्ये घडली. या प्रकरणी 15 जणांविरोधात अंबरनाथ  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापैकी 6 जणांना पोलिसांनी अटक केली आहे. 
अंबरनाथ येथील स्वामीनगर वरचापाडा भागात ही घटना घडली. अजय आरन आपल्या मित्रांबरोबर स्वामीनगरकडे जात होता. त्या ठिकाणी उभे असलेल्या 10 ते 12 तरूणांनी  अजय व त्याच्या मित्रांना शिवीगाळ केली. या प्रकरणी त्या तरूणांना जाब विचारला असता शंकर याने त्याच्या हातातील बिअरची बाटली अजयचा मित्र आयप्पनच्या डोक्यावर  फोडली. यात दोघे गंभीररित्या जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत.