Breaking News

वाशिंद रेल्वे स्थानकात प्रवाशांनी दादर-अमृतसर एक्सप्रेस रोखली

मुंबई, दि. 01, सप्टेंबर - मागील काही दिवसांपासून रेल्वे सेवा ठप्प असल्यामुळे वाशिंद स्थानकावर संतप्त प्रवाशांनी आज दादर-अमृतसर एक्सप्रेस रोखून धरली.  यावेळी प्रवाशांनी रेल्वे सेवा लवकरात लवकर पूर्ववत करा अशी मागणी केली. मात्र रेल्वे सेवा पूर्वपदावर येण्यासाठी अजून आठ दिवस तरी लागतील असे सांगण्यात  आले असल्याचे समजते.
मंगळवारी सकाळी आसनगाव स्थानकाजवळ नागपूर-मुंबई दुरांतो एक्सप्रेसचे 7 डबे रुळावरून घसरले होते. त्यामुळे कसारा- टिटवाळा मार्गावरील वाहतूक ठप्प  झाली होती. या घटनेला तीन दिवस उलटून गेले तरी अद्याप रेल्वे सेवा पूर्वपदावर आलेली नाही. या मार्गावर सध्या टिटवाळापर्यंतच रेल्वे सुरु आहेत. त्यापाठोपाठ  मंगळवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने झोडपल्याने मध्य रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे . त्यामुळे येथील प्रवाशांचे हाल होत आहेत.