Breaking News

राष्ट्रवादी काँग्रेस तालुकावार जाऊन शेतकर्‍यांशी चर्चा करणार

नाशिक, दि. 25, सप्टेंबर - शेतकर्‍यांशी त्यांच्या विविध स्तरावर व समस्यांवर चर्चा करण्यासाठी नाशिक जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुकावार शेतकरी व  कार्यकर्ता बैठकांचे नियोजन करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार यांनी दिली आहे.
सध्या शेतकरी हा सर्वाधिक दु:खी घटक असून मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. नाशिक जिल्ह्यातील शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असल्याने थेट  आत्महत्या करण्यासारखे टोकाचे पावले उचलत आहे. अशा परिस्थितीत देखील सत्ताधारी भाजप-शिवसेना युती सरकारने शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले आहे. त्यामुळे  शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी व चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तालुकावार जावून शेतकर्‍यांशी चर्चा करणार आहेत. यानंतर ऑक्टोंबर महिन्याच्या  पहिल्या आठवड्यात मोठे आंदोलन करण्यात येणार असल्याचे देखील जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. रविंद्र पगार यांनी सांगितले आहे.
तालुकावार शेतकर्‍यांशी चर्चा करण्यासाठीच्या दौर्‍यात राष्ट्रवादी काँग्रेस किसान सेलचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार शंकरआण्णा धोंडगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष  अ‍ॅड. रविंद्र पगार यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी व पक्षाचे सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष सहभागी होणार आहेत.