अमरावती जिल्ह्यात बंधा-यात बुडून तीन मुलांचा मृत्यू
चिखलदरा, दि. 25, सप्टेंबर - अमरावती जिल्ह्यातील मोथा गावात शनिवारपासून बेपत्ता असलेल्या तिघांचा येथील कृषी विभागाच्या बंधा-यात बुडून मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले. राजेश राजाराम दहीकर (17), अशोक प्यारेलाल भास्कर (8), प्रेम प्यारेलाल भास्कर (11) अशी त्यांची नावे आहेत. मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे.
शनिवारी दुपारी हे तिघेही मोथा गावात कृषी विभागाने तयार केलेल्या बंधा-यात पोहण्यासाठी गेले होते. यातील दोघांना पाण्यात बुडताना पाहून तिस-याने उडी घेतली व त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना वाचवितानाच तोही बुडला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. . या घटनेमुळे नजीकच्या मोथा गावात शोककळा पसरली आहे.
शनिवारी दुपारी हे तिघेही मोथा गावात कृषी विभागाने तयार केलेल्या बंधा-यात पोहण्यासाठी गेले होते. यातील दोघांना पाण्यात बुडताना पाहून तिस-याने उडी घेतली व त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना वाचवितानाच तोही बुडला असल्याचा अंदाज वर्तविला जात आहे. . या घटनेमुळे नजीकच्या मोथा गावात शोककळा पसरली आहे.