Breaking News

परभणी ते मनमाड रेल्वेच्या दुहेरीकरणाचा प्रश्‍न सुटणार

औरंगाबाद, दि. 30, सप्टेंबर -  परभणी ते मनमाड रेल्वेच्या दुहेरीकरणाचा प्रलंबित असलेला प्रश्‍न लवकरच सुटणार असून रेल्वेंची औरंगाबादला दुरूस्ती आणि  स्वच्छता यंत्रणा (पिटलाईन)सुरू झाल्यानंतर औरंगाबाद शहरातून नव्या गाड्या सोडण्यात येणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक विनोदकुमार  यादव यांनी गुरुवारी दिली.
मानवरहित रेल्वे फाटकामुळे तींस टक्के अपघात होत असल्यामुळे या बाबतच्या सुरक्षिततेचे उपाय करण्यात येत आहेत.
पिटलाईन करण्याच्या दृष्टीने विनोदकुमार यादव यांनी चिकलठाणा रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. या वेळी दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक डॉ.  ए. के. सिन्हा यांची उपस्थिती होती.