मान्सूनचा मुक्काम लांबणीवर, हवामान विभागाचा अंदाज
पुणे, दि. 26, सप्टेंबर - राज्यात वरुणराजाने विश्रांती घेतली असून कोकणासह तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरींनी हजेरी लावली. दरम्यान, यंदाच्या वर्षी मान्सूनचा परतीचा प्रवास लांबणार असून सप्टेंबर अखेरपर्यंत माघारी फिरण्यास अनुकूल वातावरण निर्माण होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.पश्चिम राजस्थानातून सर्वसाधारणपणे 1 सप्टेंबरपासून मान्सूनच्या परतीच्या प्रवासाला सुरुवात होते. बंगालच्या उपसागरावरून येत असलेले उष्ण वारे, वेस्टर्न डिस्टर्बन्स व वारंवार निर्माण होणार्या कमी दाबाच्या क्षेत्रांमुळे मान्सूनच्या परतीच्या प्रवासावर परिणाम झाला आहे.