Breaking News

जितेंद्र आव्हाडांनी मुंबई विद्यापीठाला टाळं ठोकलं

मुंबई, दि. 08, ऑगस्ट - मुंबई विद्यापीठाचे निकाल वेळेत न लागल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी विद्यापीठाच्या गेटला कुलूप ठोकलं आहे. निकालांची  दुसरी डेडलाईनही उलटून गेल्यामुळे आव्हाडांनी हे प्रतिकात्मक पाऊल उचललं आहे.
ठरलेल्या वेळेत निकाल न लागल्यास टाळं ठोकू, अशी भूमिका जितेंद्र आव्हाडांनी आधीच मांडली होती. त्याप्रमाणे सोमवारी रात्री आव्हाडांनी टाळं ठोकलं.  युनिव्हर्सिटीच्या कलिना गेटला आव्हाडांनी कुलूप ठोकून प्रतिकात्मक आंदोलन केलं. त्याचप्रमाणे उच्च आणि तंत्र शिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकरांच्या राजीनाम्याची  मागणीही त्यांनी केली. अनेक विद्यार्थ्यांना परदेशातील विद्यापीठांमध्ये प्रवेश घ्यायचा असतो. त्यासाठी निकाल आणि गुणपत्रिकेची आवश्यकता असते. मात्र ऑगस्टचा  पहिला आठवडा आला, तरी सर्व परीक्षांचे निकाल न लागल्याचं सांगत विद्यार्थ्यांच्या वतीने आव्हाडांनी संताप व्यक्त केला.