कसोटी क्रिकेट सिरीज जिंकल्यावर टीम इंडीयाने केली धमाल...
नवी दिल्ली, 09 . ऑगस्ट - भारतीय क्रिकेट टीमने श्रीलंकेविरुद्ध असलेल्या तीन मॅचच्या टेस्ट सिरीज मध्ये 2-0 अशी आघाडी घेतली आहे. भारताने रविवारी सिंहली स्पोर्ट्स क्लबच्या मैदानावर झालेल्या दुसर्या टेस्ट मॅचच्या चौथ्या दिवशी श्रीलंकेला 53 धावांनी हरवले.
गॉलमध्ये झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात 304 धावांनी विजय मिळवला होता. श्रीलंकेविरुद्ध भारताचा हा पहिला विजय होता. तर दुसरीकडे श्रीलंकेला 2000 नंतर पहिले अपयश मिळाले होते. 2000 मध्ये पाकिस्तानने श्रीलंकेला गॉलमध्येच 163 धावांनी हरवले होते. विराट कोहली हा असा पहिला भारतीय कर्णधार आहे, ज्याने श्रीलंकेविरुद्ध दोन सिरीज जिंकल्या आहेत.
कोहली कर्णधार असताना भारताने सातत्याने आठवी सिरीज जिंकली आहे. दुसर्या कसोटी सामन्याच्या विजयानंतर कोहली आणि त्याची टीम हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये मस्ती करताना दिसत आहेत. भारतीय क्रिकेट टीमच्या अधिकृत फेसबुक पेजवरून त्यांच्या मस्तीचा व्हिडीओ शेयर करण्यात आला. व्हिडिओमध्ये कर्णधार कोहली, हरमन मौला, रवींद्र जडेजा, शिखर धवन आणि अजिंक्य रहाणे हे खेळाडू दिसत आहेत. दोन्ही देशांमध्ये तिसरा कसोटी सामना 12-16 ऑगस्टला होणार आहे.