संघात लवकरच मोठे बदल पाहायला मिळतील : कोहली
दम्बुला, दि. 22, ऑगस्ट - टीम इंडियानं 9 गडी राखून श्रीलंकेविरुद्धचा पहिलाच वनडे सामना सहज खिशात टाकला आणि 5 सामन्यांच्या मालिकेत 1-0 नं बढत घेतली. या शानदार कामगिरीनंतरही कर्णधार विराट कोहलीनं येत्या काही सामन्यांमध्ये संघात मोठे बदल करण्याचे संकेत दिले आहेत.
सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट म्हणाला की, ‘भारतीय संघ 2019 साली इंग्लंडमध्ये होणार्या विश्वचषकाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे सर्व खेळाडू्ंना संधी मिळावी यासाठी संघात काही बदल केले जातील.’ ‘आम्ही इथं प्रयोग करणार आहोत. त्यामुळे यापुढे तुम्हाला नवे बदल पाहायला मिळतील. यामध्ये सर्व खेळाडूंना सहभागी करुन घेतलं जाईल. मात्र, असं असलं तरी संघाचा ताळमेळ बिघडणार नाही.’ असं विराट म्हणाला.
सामना संपल्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत विराट म्हणाला की, ‘भारतीय संघ 2019 साली इंग्लंडमध्ये होणार्या विश्वचषकाच्या तयारीला लागला आहे. त्यामुळे सर्व खेळाडू्ंना संधी मिळावी यासाठी संघात काही बदल केले जातील.’ ‘आम्ही इथं प्रयोग करणार आहोत. त्यामुळे यापुढे तुम्हाला नवे बदल पाहायला मिळतील. यामध्ये सर्व खेळाडूंना सहभागी करुन घेतलं जाईल. मात्र, असं असलं तरी संघाचा ताळमेळ बिघडणार नाही.’ असं विराट म्हणाला.
