Breaking News

तिसर्‍या एकदिवसीय सामन्यात प्रेषकांचा गोंधळ

कॅण्डी, दि. 28, ऑगस्ट - भारत विरुद्ध श्रीलंका यांच्यातील तिसर्‍या वन डेत प्रेक्षकांचा अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. भारताला विजयासाठी केवळ 8 धावांची  आवश्यकता असताना प्रेक्षकांनी मैदानात बाटल्या फेकल्या. ज्यामुळे खेळ थांबवावा लागला. काही काळानंतर मैदानाचा एक भाग खाली करण्यात आला. त्यानंतर  खेळाडूंना पुन्हा मैदानात बोलावण्यात आलं. दरम्यान या गोंधळाप्रकरणी अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.
विराट कोहलीच्या टीम इंडियाने कॅण्डीच्या तिसर्‍या वन डेत श्रीलंकेचा सहा विकेट्सनी धुव्वा उडवून, श्रीलंका दौर्‍यातल्या पाच सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी  विजयी आघाडी घेतली. जसप्रीत बुमराने पाच विकेट्स घेऊन, तर रोहित शर्माने नाबाद शतक ठोकून भारताच्या विजयात प्रमुख भूमिका बजावली. या सामन्यात टीम  इंडियासमोर विजयासाठी अवघं 218 धावांचं आव्हान होतं. पण श्रीलंकेच्या गोलंदाजांनी भारताची चार बाद 61 अशी अवस्था करून सामन्यात रंग भरला. त्या  परिस्थितीत रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनीने पाचव्या विकेटसाठी 139 धावांची अभेद्य भागीदारी रचून टीम इंडियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.