Breaking News

जागेच्या वादातून दोन गटात मारामारी ; गुन्हा दाखल

अहमदनगर, दि. 29 - जागेच्यावादातून दोन गटांत झालेल्या मारामारीत चौघेजण जखमी झाले आहेत. सदची  घटना नगर तालुक्यातील जेऊर येथे सोमवारी रात्री घडली. याप्रकरणी तिघांच्या विरोधात एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. 
जेऊर बायजाबाई येथील प्रेमचंद रमेश आढाव, नंदू रमेश आढाव रमेश प्रभाकर आढाव अशी आरोपींची नावे आहेत. सोमवारी रात्री  आठच्या सुमारास प्रेमचंद, नंदू रमेश आढाव या तिघांनी जागेच्या कारणावरून शिवराम नाना पाटोळे यांच्याशी वाद घातला. शिवाजी पाटोळे, राहीबाई पाटोळे, सचिन पाटोळे दादू पाटोळे यांना लाकडी दांडक्याने मारहाण करण्यात आली. त्यात हे चौघेजण जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. शिवराम पाटोळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील तपास सहायक फौजदार पालवे करत आहेत.