Breaking News

सामाजिक न्याय भवनाचे काम लवकर मार्गी लावा

।  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे निर्देश

अहमदनगर, दि. 29 - अहमदनगर शहरात बांधण्यात येणार्‍या सामाजिक न्याय भवनाचे काम लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या सूचना केंद्रीय सामाजिक न्याय व सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांनी येथे दिल्या. याबाबतच्या तांत्रिक अडचणी तात्काळ दूर करण्याबाबतची कार्यवाही करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालय सभागृहात श्री. आठवले यांनी यासंदर्भात वरिष्ठ अधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी जिल्हाधिकारी अभय महाजन, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र बिनवडे यांच्यासह समाजकल्याण, सार्वजनिक बांधकाम आणि महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी त्यांनी सामाजिक न्याय भवनाच्या रखडलेल्या कामांसंदर्भात आणि सध्या या कामाविषयीच्या काय अडचणी आहेत, तेही जाणून घेतल्या.
याशिवाय, श्री. आठवले यांनी, जिल्ह्यात गेल्या पाच वर्षात दलितांवर झालेल्या अत्याचारासंदर्भातील घटनांची माहिती घेतली.
शेतकरी कर्जमाफीच्या अनुषंगानेही त्यांनी यावेळी माहिती जाणून घेतली.