Breaking News

कल्याणमध्ये शेतकर्‍यांचं उग्र आंदोलन, पोलिसांच्या गाड्या पेटवल्या

कल्याण, दि. 22 - नेवाळी विमानतळासाठी सरकारने जबरदस्तीने जमिनी संपादित केल्याच्या विरोधात नाका परिसरकार शेतकर्‍यांचं उग्र आंदोलन सुरु आहे.  आक्रमक झालेल्या आंदोलकांनी डोंबिवली-बदलापूर पाईपलाईन रोडवर डावलपाडा गावाजवळ पोलिसांच्या गाड्या पेटवल्या. आपल्याच मालकीच्या शेतजमिनींवर  पेरणी करण्यास मज्जाव केल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यामुळे शेतकर्‍यांनी कल्याण-मलंगगड रस्ता रोखून धरला. शिवाय टायर जाळून मलंगगडाकडे जाणारा  मुख्य रस्ता बंद केला. इतकंच नाही तर पोलिसांवर दगडफेकही केली.
ब्रिटीश काळात दुसर्‍या महायुद्धात लष्कराने नेवाळे गावाजवळ धावपट्टीसाठी जागा घेतली होती. मात्र त्यानंतर ती जागा शेतकर्‍यांच्या  ताब्यात आली होती. परंतु  यावर्षी पुन्हा नौदलाने या जागेवर दावा करत तिथे कम्पाऊंड टाकायला सुरुवात केली आहे. याला या शेतकर्‍यांनी विरोध केला आहे जवळपास या भागातील 7 ते 8  गावांची जमिनी ताब्यात घेतली आहे.