तर आझम खान यांचा शिरच्छेद करण्यात आला असता - सुब्रहमण्यम स्वामी
लखनौ, दि. 30 - मुस्लिम राष्ट्रांतील लष्कराबाबत जर आझम खान यांनी वक्तव्य केले असते तर त्यांचा शिरच्छेद करण्यात आला असता, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे नेते सुब्रहमण्यम स्वामी यांनी केले. जवानांनी महिलांवर अत्याचार केले म्हणून महिलांनी त्यांचे गुप्तांग कापले. हात किंवा शीर न कापता शरीरातील ज्या भागासंबंधी त्यांची तक्रार होती, तोच भाग कापून ते घेऊन गेले. त्यांनी एक मोठा संदेश दिला असून, संपूर्ण देशाला याची लाज वाटली पाहिजे, असे वक्तव्य आझम खान यांनी केले होते.
यावर स्वामी यांनी कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, आझम खानसारख्या लोकांना नेहमी चर्चेत राहण्यासाठी नेहमीच अशी वक्तव्य करत असतात. असे लोक मुस्लिम समाजालाही फसवत असतात. त्यांना भारतात ज्या प्रकारच्या लोकशाहीची मजा घेता येते तशी कुठल्या मुस्लिम देशात घेता आली नसती. त्यांनी कुठल्याही मुस्लिम देशात असे वक्तव्य केले असते तर त्यांचे शिरच्छेद करण्यात आला असता, असे त्यांनी नमूद केले.
यावर स्वामी यांनी कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, आझम खानसारख्या लोकांना नेहमी चर्चेत राहण्यासाठी नेहमीच अशी वक्तव्य करत असतात. असे लोक मुस्लिम समाजालाही फसवत असतात. त्यांना भारतात ज्या प्रकारच्या लोकशाहीची मजा घेता येते तशी कुठल्या मुस्लिम देशात घेता आली नसती. त्यांनी कुठल्याही मुस्लिम देशात असे वक्तव्य केले असते तर त्यांचे शिरच्छेद करण्यात आला असता, असे त्यांनी नमूद केले.