शेतकरी महिलेचा वीज पडून मृत्यु
नांदेड, दि. 12 - मौजे कंधार तालुक्यातील चिखली गावातील अहिल्याबाई कांशीराम कांबळे वय 45 वर्ष या महिलेचा शेतात वीज पडून दुर्दैवी मृत्यु झाला आहे.
तालुक्यातील मौजे चिखली येथील मयत अहिल्याबाई कांशीराम कांबळे या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतात गेल्या होत्या. शेतीतील कामे आटपून वादळीवारा सुटल्याने घराकडे परत निघाल्या. दरम्यान वादळी वारा, पाऊस आणि विजांचा कडाडून पांदण रस्त्याने येताना महिलेवर वीज पडल्याने त्या जागीच ठार झाल्या. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच तेथील सजाचे तलाठी मारोती कदम व उस्मानगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मयत अहिल्याबाई यांच्या पाश्चात कांशीराम कांबळे (पती), मुलगी कोमल, काजल व मुलगा किरण असा त्यांचा परिवार आहे. या घडलेल्या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असुन, मयत अहिल्याबाई यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने आपत्कालीन योजनेतून मदत देऊन हातभार लावावा अशी मागणी गावक-यांकडून केली जात आहे.
तालुक्यातील मौजे चिखली येथील मयत अहिल्याबाई कांशीराम कांबळे या खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी शेतात गेल्या होत्या. शेतीतील कामे आटपून वादळीवारा सुटल्याने घराकडे परत निघाल्या. दरम्यान वादळी वारा, पाऊस आणि विजांचा कडाडून पांदण रस्त्याने येताना महिलेवर वीज पडल्याने त्या जागीच ठार झाल्या. घडलेल्या घटनेची माहिती मिळताच तेथील सजाचे तलाठी मारोती कदम व उस्मानगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मयत अहिल्याबाई यांच्या पाश्चात कांशीराम कांबळे (पती), मुलगी कोमल, काजल व मुलगा किरण असा त्यांचा परिवार आहे. या घडलेल्या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असुन, मयत अहिल्याबाई यांच्या कुटुंबियांना शासनाच्या वतीने आपत्कालीन योजनेतून मदत देऊन हातभार लावावा अशी मागणी गावक-यांकडून केली जात आहे.