आसामध्ये आठ जिल्ह्यांत पूर, एक लाखापेक्षा अधिक नागरिकांना पुराचा फटका
दिसपूर, दि. 29 - आसाममधील आठ जिल्ह्यांमध्ये आलेल्या पूरामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या पूराचा फटका एक लाखापेक्षा अधिक नागरिकांना बसला आहे. पुरामध्ये 188 गावे पाण्याखाली आहेत. तसेच राज्यातील चार नद्या धोक्याची पातळी ओलांडू शकतील अशी शक्यता वर्तविली आहे.
राज्यातील लखीमपूर,जोरहाट,करीमगंज,कार्बी आंगलोंग,काछार, गोलाघाट, शिवसागर आमि सोनितपूर या जिल्ह्यात पूरपरिस्थिती असल्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. पुरामुळे 1126 हेक्टअर शेतजमीन पाण्याखाली असून सोनितपुर आणि जोरहाट जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. पुरामुळे 4400 लोक स्थलांतरीत झाले आहेत.
राज्यातील लखीमपूर,जोरहाट,करीमगंज,कार्बी आंगलोंग,काछार, गोलाघाट, शिवसागर आमि सोनितपूर या जिल्ह्यात पूरपरिस्थिती असल्याचे आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे. पुरामुळे 1126 हेक्टअर शेतजमीन पाण्याखाली असून सोनितपुर आणि जोरहाट जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे. पुरामुळे 4400 लोक स्थलांतरीत झाले आहेत.