Breaking News

संघर्षा शिवाय यश नाही : आय.जी.कृष्णप्रकाश

। युवानच्या ‘प्रेरणा’ उपक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद

अहमदनगर, दि. 17 - तुम्ही कुठल्याही क्षेत्रात असा परंतु संघर्षाशिवाय जीवनात यश नाही. आपल्या क्षमता, कौशल्य, कल ओळखून निवडलेल्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी काहीप्रमाणात धोका पत्करावा लागतो आपल्यावर होणार्‍या टीका टिप्पणीला बोलण्यापेक्षा कृतीतून उत्तर दिल्यास त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळतो. आपलेकर्तव्य हाच आपला धर्म मानून प्रत्येक कृती देशहीत समोर केल्यास  ठेऊन उज्ज्वल भारताचे स्वप्न दूर नाही, असे प्रतिपादन विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाशयांनी केले. युवान आयोजित ‘प्रेरणा’ कार्यक्रमात काल त्यांनी हजारो विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आपल्या धीरगंभीर आणि तितक्याच मिश्किल शैलीने त्यांनी सलग 2 तास नवोदित अधिकारी व विद्यार्थ्यांशी संवाद साधत  उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
यंदाच्या एम.पी. एस. सी. परीक्षेत महाराष्ट्रात सर्वप्रथम येण्याचा मान मिळवलेल्या भूषण अहिरे याचा विशेष गौरव व नगर जिल्यातील यशस्वीत भाऊसाहेबढोले, अंजुम पठाण, दत्तात्रय भिसे, हर्शल डाके, अमोल पाठक, गोविंद वाकडे,  अमोल चव्हाण या विद्यार्थ्यांचा सन्मान कृष्ण प्रकाश, आशाताई फिरोदिया, प्रतिभाजी धूत, सी.ए. अशोक पितळे यांच्या हस्ते करण्यात आला. हार, फुले, शाली इ. टाळून हस्तलिखित मानपत्र, पुस्तक, पर्यावरण पूरक पेपर बॅग, कागदी फुले, ग्रीटिंग्स देऊनसर्वांचा सन्मान करण्यात आला. सावेडीतील माऊली सभागृहातील कार्यक्रमाच्या गर्दीने यावेळी उच्चांक गाठला. सकाळी 11 वाजता कार्यक्रमाची वेळ असूनही 10 वाजताचसभागृह हाऊसफुल झाले . 11 वाजेपर्यंत सभागृहापेक्षा सभागृहाबाहेरील गर्दी अधिक झाल्याने ‘टीम युवानने’ तातडीने बाहेरील विद्यार्थ्यांसाठी एल. इ. डी. टीव्हीचीव्यवस्था केली. त्यामुळे नगर जिल्यातील कानाकोपर्‍यातून मार्गदर्शन ऐकण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांना लाइव्ह कार्यक्रमाचा आनंद घेता आला.
उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब ढोले, सहाय्यक विक्रीकर आयुक्त दत्तात्रय भिसे,  कक्ष अधिकारी अंजुम पठाण यांनीही यावेळी आपली मनोगते व्यक्त केली.योगायोग म्हणजे यातील अनेकांची मुलाखत घेणार्‍या पॅनल मध्ये विशेष पोलीस महानिरीक्षक कृष्ण प्रकाश यांचा समावेश होता. आपल्या चिरपरिचित मैत्रीपूर्ण शैलीनेत्यांनी मुंबईला मुलाखतीवेळी निर्माण झालेली भीती कशी लगेच दूर केली, याचा खुलासा केला. विविध कायद्यासह त्यांचा नगर जिल्ह्याचा  अभ्यास विद्यार्थ्यांच्याज्ञानाचा, समजुतीचा मोठा कस पाहणारा ठरल्याचे विद्यार्थ्यांनी आवर्जून नमूद केले. अधिकारी होऊनही समाजाशी विशेतः वंचित बांधवांशी असलेली नाळ तुटू न देताअधिकारी कसा असावा, याचा आदर्श वस्तुपाठच त्यांनी नवोदित अधिकार्‍यांना घालून दिला. गांधीवादी समाजसेवक सुब्बराव यांच्या प्रेरणा व  मार्गदर्शनाने स्थापित ‘युवानच्या’ कार्या बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. नगरच्या अधिकाधिक युवकांनी‘युवानच्या’ उपक्रमांचा नियमित लाभ घेऊन  सेवा कार्यात आपले यथाशक्ती योगदान द्यावे, असे आवाहन केले. मागील वर्षभरात विविध क्षेत्रात उल्लेखनीय यशमिळवलेल्या ‘युवान’  विद्यार्थ्यांचा सन्मान ही यावेळी कृष्ण प्रकाश यांच्या हस्ते करण्यात आला. यात विक्रीकर निरीक्षक महादेव लांडगे, रवींद्र जगधने, नामांकितखाजगी कंपनीत परिसर मुलाखतीद्वारे निवड झालेल्या सुधीर पालवे, गणेश हंडाळ, संभाजी मोहिते यांचा समावेश होता.प्रास्ताविकात संदीप कुसळकर यांनी कार्यक्रमा मागील ‘युवानची’ भूमिका विशद केली. स्पर्धा परीक्षेसारख्या ‘सेवा’ क्षेत्रातही खाजगी क्लासेसच्या वाढत्या व्यवसायिकीकरणाबद्दल चिंता व्यक्त करून सामान्य घरातील गरीब  विद्यार्थ्यांसाठी मोफत व अदयावत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शनाचा मनोदय व्यक्त केला. त्यास उपस्थित अधिकार्‍यांनी तात्काळ सकारात्मक प्रतिसाद देत सर्वोतोपरी सहयोगाचे आश्‍वासन दिले.     सूत्रसंचालन प्रसाद बेडेकर यांनी केले. आभार सचिव सुरेश मैड यांनी मानले. संजय दळवी, हेमंत लोहगावकर, गोरख दराडे, सुप्रिया मैड, पूजा फसले यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.