Breaking News

राष्ट्रीय कृषी विमा योजनेतून शेतकर्‍यांना 893 कोटी रुपयांची नुकसान भरपाई

मुंबई, दि. 02 - रब्बी हंगाम 2015-16 मधील 8 अधिसूचित पिकांकरिता राबविण्यात आलेल्या राष्ट्रीय कृषी विमा योजनेंतर्गत राज्यातील 26 लाख 88 हजार शेतकर्‍यांना 893 कोटी 83 लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे. लातूर विभागात सर्वाधिक सुमारे 13 लाख शेतकर्‍यांना 402 कोटी रुपयांची नुकसान भरपाई वाटप करण्यात येणार आहे. बँकांकडून पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.
राज्यातील 34.26 लाख शेतकर्‍यांनी योजनेत सहभाग घेतला होता. योजनेत सहभागी झालेल्या शेतकर्‍यांनी 56 कोटी 91 लाख विमा हप्ता भरुन 24.60 लाख हेक्टर क्षेत्राकरिता 2865.40 कोटी रुपयांचे विमा संरक्षण  घेतले होते. योजनेत सहभागी झालेल्या शेतकर्‍यांपैकी नुकसान भरपाईस पात्र ठरलेल्या 26.88 लाख शेतकर्‍यांना 893.83 कोटीरुपयांची नुकसान भरपाई मंजुर झाली आहे. त्यापैकी शेतकरी विमा हप्ता वजा जाता केंद्र शासनाचा हिस्सा. 408.92 कोटी रुपये व राज्य शासनाचा हिस्सा 408.92 कोटी रुपये अशी एकुण 817.84 कोटी  रुपये भारतीय कृषी विमा कंपनीस उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
भारतीय कृषि विमा कंपनीकडुन एकत्रित नुकसान भरपाई 893.83 कोटी रुपयांची रक्कम संबंधीत बँकांकडे वर्ग करण्यात आलीआहे. संबंधीत बँकांकडून पात्र शेतकर्‍यांच्या बँक खात्यावर जमा करण्याची कार्यवाही सुरु झाली आहे.