नगरमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीला उडवले, दोघांचा जागीच मृत्यू
अहमदनगर, दि. 02 - अहमदनगरमध्ये भरधाव ट्रकने दुचाकीवरुन जाणार्या दोघांना उडवले. अमरापूर-शेवगाव मार्गावर ही दुर्दैवी अपघात झाला. संजय ओमासे आणि हनुमंत सानप अशी मृतांची नावे आहेत.
संजय आणि हनुमंत हे दोघेही दुचाकीवरुन शेवगावहून अमरापूरकडे जात होते. मात्र त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणार्या भरधाव ट्रकने फलकेवाडीजवळ या दोघांना चिरडले. गंभीर दुखापत झाल्याने दोघांनी तिथेच प्राण सोडले. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला आहे. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान भरधाव वेगाने वाहनारी वाहने आणि रस्त्यांच्या दूरवस्थेमुळे दिवसेंदिवस अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे.
संजय आणि हनुमंत हे दोघेही दुचाकीवरुन शेवगावहून अमरापूरकडे जात होते. मात्र त्याचवेळी विरुद्ध दिशेने येणार्या भरधाव ट्रकने फलकेवाडीजवळ या दोघांना चिरडले. गंभीर दुखापत झाल्याने दोघांनी तिथेच प्राण सोडले. अपघातानंतर ट्रक चालक पसार झाला आहे. या अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान भरधाव वेगाने वाहनारी वाहने आणि रस्त्यांच्या दूरवस्थेमुळे दिवसेंदिवस अपघातांच्या घटनेत वाढ होताना दिसत आहे.