Breaking News

राजौरीत पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन

भारतीय सैन्याकडून चोख प्रत्युत्तर

राजौरी (जम्मू-काश्मीर), दि. 26 - जम्मू-काश्मीरमधील राजौरीमध्ये पाकिस्तानने पुन्हा एकदा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. त्याला प्रत्युत्तर देताना भारतीय जवानांनी पाकिस्तानच्या 3 सैनिकांचा खात्मा केला.
जम्मूच्या आरएसपुरा आणि नौशेराजवळील सीमाभागात वारंवार पाकिस्तानी सैन्याकडून गोळीबार करण्यात येतो आहे. पाकिस्तानच्या गोळीबारात 7 जण जखमी  झाल्याचीही माहिती मिळते आहे. या गोळीबारानंतर भारतीय सैन्यानेही पाकिस्तानवर आक्रमण केले. पाकिस्तानच्या 5 ते 6 रेंजर पोस्टला या गोळीबारात उद्ध्वस्त  करण्यात भारतीय जवानांना यश आले आहे. या गोळीबाराच्या पार्श्‍वभूमीवर राजौरीतील शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत.