Breaking News

सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबारात दोन जवानांना वीरमरण

श्रीनगर, दि. 29 - पाकिस्तानच्या गोळीबारात दोन भारतीय जवानांना वीरमरण आले आहे. महाराष्ट्रातील सांगलीचे सुपुत्र नितीन सुभाष हे पाकच्या हल्ल्यात धारातीर्थी पडले. कुपवाडाच्या माछील सेक्टरमध्ये झालेल्या हल्ल्यात ते शहीद झाले.
गेल्या तीन ते चार दिवसांपासून पाकिस्तानच्या कुरापतींमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. कठुआ स्केटरमध्येही तोफमारा करत पाकिस्तानाने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले. भारतीय जवानही पाकिस्तानी सैन्याला सडेतोड उत्तर देत आहेत. दरम्यान, कुपवाड्यात पाकिस्तानने केलेल्या गोळीबारात शिख रेजिमेंटच्या मनदीप सिंह यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. भारताच्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानने तब्बल 53 वेळा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आहे.