Breaking News

प्रत्त्युत्तरात 15 पाकिस्तानी सैनिक ठार - अरुण कुमार

श्रीनगर, दि. 28 - शस्त्रसंधीचे उल्लंघन करणा-या पाकिस्तानला सीमा सुरक्षा दलाने दिलेल्या प्रत्त्युत्तरात 15 पाकिस्तानी सैनिक मारले गेले आहेत, अशी माहिती सीमा सुरक्षा अतिरिक्त महासंचालक अरुण कुमार यांनी दिली.
कुमार म्हणाले की, जखमी झालेल्या सैनिकांबाबत आता सांगता येणार नाही. मात्र 15 सैनिक मारले गेले आहेत. भारतीय सैनिक कधीही निवासी क्षेत्रातील लोकांना लक्ष्य करणार नाही. मात्र जर पाकिस्तानने हल्ला केल्यास त्याला चोख प्रत्त्युत्तर दिले जाईल, असे कुमार यांनी सांगितले.
संरक्षर विभागाच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, सीमा सुरक्षा दल व सैनिक शक्य त्या परिस्थितीत प्रत्त्युत्तर देत आहेत. राजौरीमधील सुंदरबनी, पल्लनवाला व नौशेरा भागात व जम्मू जिल्ह्यात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. पाकिस्तानकडून गोळीबारासाठी छोटी हत्यारे, स्वयंचलित 82 मिमी व 120 मिमी मोर्टारचा वापर करण्यात आला. त्यांना प्रत्त्युत्तर दिले जात आहे. भारतीय सैनिकांमध्ये कुणीही शहीद झाल्याचे वृत्त नाही, असेही प्रवक्त्यांनी सांगितले.