Breaking News

बालविवाहाचा घाट घालणार्‍या आई-वडिलांविरोधात पोलिसात तक्रार


पुणे, 21 -  पुण्यातील एका अल्पवयीन मुलीने स्वत:चाच बालविवाह रोखण्याचे 15 वर्षीय मुलीने पोलिसात तक्रार करत आई-वडिलांनी घातलेला बालविवाहाचा या घाट उधळून लावला आहे. पोलिसांनी संबंधित मुलीच्या पालकांना बालविवाहविरोधी कायद्याची समज दिली आणि सोडले.
या मुलीचे लग्न ऑगस्ट 2015 मध्ये ठरले होते. मात्र त्याचवेळी तिने लग्नाला विरोध केला होता. परंतु यानंतर आईने धमकी दिली, जबरदस्ती केली, मारहाण केली आणि लग्नाला उभे केले. सगळ्यांनी तिला समजावले, पण तिने कोणाचेही ऐकले नाही. महत्त्वाचे म्हणजे लग्न ठरवल्याचे आई-वडिलांनी पोलिसांकडे अजूनही कबूल केलेले नाही, असे मुलीने सांगितले. महत्त्वाचे म्हणजे या अल्पवयीन मुलीचा ज्या मुलाशी विवाह होणार होता, त्या मुलाशीही तिला बोलू देत नव्हते. मुलीचा विरोध सुरु असल्याने प्रसंगी तिला घराबाहेर आणि कॉलेजमध्ये जाण्यास बंदी घातली. सहा महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. मात्र आजी-आजोबा आणि मित्रमैत्रिणीच्या 
पाठिंब्यामुळे पोलिसात जाण्याची हिम्मत दाखवता आली, असेही या धीट मुलीने नमूद केले. या प्रकरणात पोलिसांनीही पाठिंबा दिला. आई-वडिलांना पुन्हा त्रास दिला तर तक्रार कर, ते कोठडीत जाऊ शकतात, असा दिलासा पोलिसांनी दिल्याचे मुलीने सांगितले.