Breaking News

पूर्ववैमनस्यातून दीड वर्षाच्या मुलाला कारने चिरडले!


भिवंडी, 11 - भिवंडीतल्या कोलीवली गावात घडलेल्या घटनेबाबत धक्कादायक माहिती पुढे आली आहे. कोलीवली गावात 9 तारखेला एका कारने दीड वर्षाच्या मुलाला उडवले. मात्र, हा अपघात नव्हता तर पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.
 देवानंद पाटील आणि विश्‍वनाथ पाटील या दोन्ही शेजार्‍यांमध्ये सांडपाण्यावरुन 15 वर्षांपासून वाद होता. त्याचा राग मनात धरत आरोपी विश्‍वनाथ पाटीलने देवानंद यांचा मुलगा देवांग याला कारने उडवले आणि तो कारसहित फरार झाला. घराबाहेर खेळणार्‍या दीड वर्षीय देवांगला विश्‍वनाथ पाटील याने आपल्या कारने अक्षरश: चिरडले आणि तिथून तो फरार झाला. घटनास्थळी देवांगची काकूही उभी होती. चिमुकला देवांग गाडी खाली आल्याचे बघताच तिने आरडोओरड करुन गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, तरीही चालक विश्‍वनाथ पाटीलने गाडी चालूच ठेवली. मृत देवांगचे वडील देवानंद पाटील व त्यांच्या शेजारी राहणारे विश्‍वनाथ पाटील यांच्या कुटुंबियांमध्ये मागील 15 वर्षापासून घरातील सांडपाण्यावरुन वाद होता. त्याची तक्रार भिवंडी तालुका पोलीस स्टेशन येथे केली होती.