Breaking News

शरद जोशी यांच्या कुटुंबीयाने मरणोत्तर पद्म पुरस्कार नाकारला

पुणे, 26 - एकीकडे महाराष्ट्र आणि देशभरातील दिग्गजांचा पद्म पुरस्कारांनी सन्मान होत असताना तिकडे शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या कुटुंबीयाने मात्र मरणोत्तर पद्म पुरस्कार नाकारला आहे.
शरद जोशी जिवंत असताना त्यांच्या नावाचा विचार का झाला नाही? असा सवाल करुन जोशींच्या कन्या श्रेया शहाणेंनी यूपीए आणि भाजप सरकारच्या भूमिकेबद्दल खंत व्यक्त केली. तसेच पुरस्काराने जोशी सरांच्या कामाचे मूल्यमापन होणार नाही, असेही श्रेया शहाणेंनी म्हटले आहे. शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शरद जोशी यांनी देशभरातल्या शेतकर्‍यांना आपल्या हक्काची जाणीव करुन दिली. त्यांना लढायला शिकवले. शेतीचे अर्थकारण समजावून सांगितले.