Breaking News

वसंतराव नाईक यांच्यामुळे महाराष्ट्राचा सर्वंगिण विकास


पाथर्डी :- (प्रतिनिधी)- वसंतराव नाईक यांच्या सारख्या दूरदर्शी नेतृत्वा मुळेच महाराष्ट्राची सर्वार्थाने प्रगती होऊन आपण अन्नधान्यात स्वयंपूर्ण झालो असे प्रतिपादन बंजारा समाजाचे नेते विष्णुपंत पवार यानी केले 
राज्याचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या 105 व्या जयंती निमित्त आज तालुका कृषि विभाग आणि पंचायत समिति यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात पवार बोलत होते .अध्यक्ष स्थानी उप सभापती विष्णुपंत अकोलकर ,पंचायत समिती सदस्य सुनील ओहळ , गटविकास अधिकारी डॉ जगदीश पालवे , तालुका कृषी अधिकारी किरण मोरे , ग्रामसेवक संघटनेचे नेते एकनाथ आंधळे,आदि मान्यवर उपस्थित होते 
प्रस्ताविक किरण मोरे , सूत्रसंचालन व आभार सहायक गट विकास अधिकारी एच जी खलेकर यानी मानले 
तर सकाळी तालुका प्रशासनच्या वतीने तहसीलदार नामदेव पाटिल ,सेवालाल कोळसा संघटनेच्या वतीने अध्यक्ष प्रभाकर पवार , सचिव विनायक राठोड ,नगरपालीकेच्या वतीने नगरध्यक्ष डॉ मृत्यूजय गर्जे आरोग्य समितीचे चेअरमन नामदेव लबडे,सेवालाल - जगदंबा भक्त मंडळ वतीने विलास पवार काळू जधाव राजू पवार , नवनाथ जधाव , सचिन चव्हाण , यानी आदरांजली वाहिली , वंचित बहुजन आघाड़ीच्या वतीने किसान चव्हाण,अरविंद सोनटके ,गोर सेनेच्या वतीने संजय पवार , अशोक चव्हाण , रंगनाथ चव्हाण यानी अभिवादन केले.