Breaking News

म. सा. प. तर्फे राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा


कोपरगाव : येथील महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेच्यावतीने तालुका विद्यार्थी सहाय्यक समितीच्या संयुक्त विद्यमाने भव्य राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. नवोदित कवी, साहित्यिकांना व्यासपीठ मिळावे, मोबाईलच्या मोहजाळातून नव्या पिढीने लिहिते व्हावे, मराठी भाषेच्या समृद्धीला आकार द्यावा, हा या मागचा उद्देश असल्याचे अध्यक्ष हिरालाल महानुभाव यांनी यावेळी सांगितले. सदर साहित्य पाठविण्याची अंतिम मुदत १४ जून पर्यंत आहे. इच्छुकांनी ग्रंथपाल, स्व. नामदेवराव परजणे लॉ कॉलेज, कोपरगाव या पत्यावर पाठवावे, असे आवाहन कार्यवाह संतोष तांदळे यांनी केले आहे.