Breaking News

रबी खरीप हंगाम पीकविमा १७ कोटी मंजूर


पारनेर I प्रतिनिधी 

तालुक्यात सन २०१६-१७ या वर्षात रबी पिकाचे नुकसान झाले. त्यांना पंतप्रधान पीक योजनेअंतर्गत रबी खरीप हंगाम पीक विमा विमा १७ कोटी ९५ लाख २४ हजार ११३ रु. मंजूर झाला आहे. ११ हजार ११८ शेतकऱ्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे संचालक उदय शेळके यांनी दिली. 

पारनेर तालुक्यातील जिल्हा बँक शाखानिहाय पीक विम्याची मंजूर आकडेवारी अशी : पारनेर- २ कोटी ३६ लाख ६६ हजार, सुपा- ३६ लाख ७२ हजार, जामगाव- १ कोटी ५८ लाख ८२ हजार, नारायणगव्हाण- १५ लाख ६६ हजार, भाळवणी १ कोटी ३५ लाख ७० हजार, रांजणगाव- ६ लाख ५८ हजार, कान्हूरपठार- १ कोटी १५ लाख ४७ हजार, टाकळीढोकेश्वर- १ कोटी २० लाख ६२ हजार, अळकुटी- ५ लाख ६८ हजार, निघोज- २ लाख ५८ हजार, वडझिरे- ४ लाख ७० हजार, पारनेर टाऊन- २ कोटी २० लाख ३० हजार, गोरेगाव- १ कोटी २७ लाख ७२ हजार, वाडेगव्हाण- ४ लाख ७२ हजार, राळेगण थेरपाळ- ५ लाख ४९ हजार, म्हस्केवाडी- ४ लाख ९६ हजार, मांडवे- २ लाख ३८ हजार, खडकवाडी- ३८ लाख ९ हजार, ढवळपुरी- १ कोटी ५७ लाख ३५ हजार, पिंपळगाव रोठा- १ कोटी १९ लाख ८६ हजार, वाळवणे- ६३ लाख ९५ हजार, पळवे खुर्द- २८ लाख ३९ हजार, जवळा- ४२ लाख १२ हजार आणि कर्जूलेहर्र्या- १ कोटी ४० लाख ६१ हजार रुपये. 

दरम्यान, कांदा, ज्वारी या पिकांसाठी हा विमा मंजूर झाला आहे. विम्याचे वाटप लवकरच शेतकऱ्यांचा करण्यात येणार आहे. विम्याच्या या अनुदानामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.