Breaking News

आ. थोरातांनी जाणून घेतल्या नागरी समस्या


संगमनेर :  तालुक्यातील पठार भागात राहत असलेल्या नागरिकांना आवश्यक असलेल्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचा टँकर वेळेत मिळतात की नाही यासह दुष्काळी परिस्थितीची माजी महसूलमंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी पाहणी करत केली. यावेळी आ. थोरात यांनी पठार भागातील विविध गावांतील वाड्यावस्त्यांवर जाऊन तेथील नागरिकांची भेट घेतली.

पठार भागातील रणखांब, खरशिंदे, खांबे, दरेवाडी, कुंभारवाडी येथे नागरिकांच्या आ. थोरातांनी समस्या जाणून घेतल्या. यावेळी त्यांच्या समवेत कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, पंचायत समिती सदस्य किरण मिंडे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. याप्रसंगी रणखांब येथील नवनाथ गुळवे या अपघातग्रस्त कुटुंबियांची त्यांनी भेट घेवून सांत्वन केले.