...तर काँग्रेस सत्तेत येईल : चंद्रकांत पाटील
तसेच, गेल्या 4 वर्षात भाजप-शिवसेना यांनी एकही निवडणूक एकत्र लढली नसल्याचं सांगत पालघर पोटनिवडणुक उद्धव ठाकरे यांनी चुकीचं राजकारण केलं असून कटुता निर्माण केली आल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. तसेच, “दिवंगत चिंतामण वनगा यांच्या कुटुंबातून एकास उमेदवारी देण्याचे भाजपने निश्चित केले होते. पण याबाबतची कसलीच खातरजमा न करता उद्धव ठाकरे यांनी वनगा यांचे सुपुत्र श्रीनिवास वनगा यास उचलून आणून उमेदवार जाहीर केला. शिवसेनेची ही कार्यशैली वादाला कारणीभूत ठरली आहे.”, असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
नरेंद्र मोदी सरकार ला 4 वर्षे पूर्ण झाल्याने विकास कामांची माहिती देण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी सरकारने आजपर्यंत केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा महसूलमंत्र्यांनी या वेळी मांडला.
नरेंद्र मोदी सरकार ला 4 वर्षे पूर्ण झाल्याने विकास कामांची माहिती देण्यासाठी राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज कोल्हापुरात पत्रकार परिषद घेऊन या पत्रकार परिषदेत नरेंद्र मोदी सरकारने आजपर्यंत केलेल्या विकासकामांचा लेखाजोखा महसूलमंत्र्यांनी या वेळी मांडला.