Breaking News

पाण्यासाठी नागरिकांची भटकंती झिरंगे नगर मध्ये कमी दाबाने नळांना पाणी


श्रीरामपूर / शहर प्रतिनिधी /- शहरातील झिरंगे नगर परिसरात नळांना अतिशय कमी दाबाने व कमी वेळ पाणी येत असून जास्त दाबाने पाणी सोडण्याची मागणी नागरिक करत आहेत. झिरंगे नगर परिसरात सकाळी सव्वा सहा वाजेच्या दरम्यान नळांना पाणी येत असते. पाणी आल्यानंतर 10 ते 15 मिनिटेच पाणी राहते. कमी वेळ व कमी दाबाने पाणी येत असल्यामुळे नागिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. शहरात काही भागात जास्त दाबाने तर काही भागात अत्यंत कमी दाबाने पाणी येते. झिरंगे नगर परिसरात जास्त दाबाने पाणी सोडण्याची मागणी नागरिक करत आहेत.