श्रीगोंदा ( प्रतिनिधी )- महाराष्ट्र सरकारच्या ई - ग्राम राज्यस्तरीय पेपरलेस समितीच्या सदस्यपदी श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील ग्रामसेवक संदीप लगड यांची विभागातून निवड करण्यात आली आहे . राज्यातील ग्रामपंचायती पेपरलेस करण्याबाबत अभ्यास करून ई . ग्राम या सॉप्टवेअर प्रणाली मध्ये किंवा आवशकता भासल्यास संबंधित कायद्यात सुधारणा सुचवणेसाठी राज्य स्तरीय समिती गठीत करण्यात आली असून या समिती मध्ये नाशिक विभागातून श्रीगोंदा तालुकयातील उक्कडगाव ग्रामपंचायतचे ग्रामसेवक संदीप लगड यांची निवड करण्यात आली आहे . राज्यातील ग्रामपंचायती कागद विरहित करण्या संदर्भात ग्राम सॉप्ट प्रणाली राज्यात लागू करण्यात आली असून 1 एप्रिल पासून राज्यातील सर्व ग्रामपंचायती कागदविरहित करण्यात येत आहेत .
संदीप लगड यांची निवड
Reviewed by Dainik Lokmanthan
on
12:18
Rating: 5