Breaking News

चारही दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे

श्रीनगर : सुंदरबनी येथील चकमकीत मारले गेलेले चारही दहशतवादी लष्कर-ए-तोयबाचे असल्याची माहिती सीमा सुरक्षा दलाचे (बीएसएफ) महासंचालक के.के. शर्मा यांनी दिली आहे.राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी परिसरात ठार झालेले हे चारही दहशतवादी आत्मघातकी पथकाचे भाग होते. आपल्या संघटनेकडून अचूक माहिती मिळाल्यानेच दहशतवाद्यांना ठार करता आल्याचीही माहिती त्यांनी दिली. ते 4 दहशतवादी ठार झाले असले तरी त्यांचे इतर गटदेखील असण्याची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे आम्ही उच्चस्तरीय सतर्कता पाळली असल्याचे शर्मा यांनी सांगितले. शर्मा म्हणाले, ‘या आत्मघातकी दहशतवाद्यांनी 4-5 दिवसांपूर्वी नियंत्रण रेष पार केली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी परिसरात शोध मोहीम सुरू केली. गुप्त माहिती मिळाल्याने सुरक्षा दल आणि स्थानिक पोलिसांनी संबंधित क्षेत्राला वेढा घातला आणि कोणत्याही नुकसानीशिवाय दहशतवाद्यांचा खात्मा के ला.’ हे दहशतवादी बीएसएफ मुख्यालयाच्या खूप जवळ होते. जर सतर्कता पाळली गेली नसती तर दहशतवाद्यांनी सुंदरबनी येथील बीएसएफ मुख्यालयाला लक्ष्य केले असते व मोठा अनुचित प्रकार घडला असता, अशीही भीती शर्मा यांनी व्यक्त केली.