Breaking News

फेरपरीक्षेला विद्यार्थ्यांना बसवू नका : ठाकरे

सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेला बसवू नका, असे आवाहन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. सीबीएसईच्या पेपर फुटीच्या पार्श्‍वभूमीवर सीबीएसई बोर्डातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची कृष्णकुंजवर भेट घेतली. यावेळी बोलतांना राज ठाकरे म्हणाले की, संबंधित विषयांच्या प्रश्‍नपत्रिका परीक्षेपूर्वीच फुटल्या हा सरकारचा हलगर्जीपणा असून, स्वतःची चूक सुधारायची किंवा मान्य करायची सोडून विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा कसल्या द्यायला लावता, सरकारला जर प्रश्‍नपत्रिकांची गोपनीयता नीट राखता येत नसेल तर त्यामध्ये या मुलांचा काय दोष, त्यांनी पुन्हा त्या विषयांच्या परीक्षेला का बसायच अस् सवाल राज ठाकरे यांनी करून, कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना फेर-परीक्षेला बसवू नका असे पालकांना आवाहन आहे. तुम्ही निर्णयावर ठाम राहा असेही ते म्हणाले.