नवी दिल्ली : इराकमधील मोसूलमध्ये अपहरण झालेल्या 39 भारतीयांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती केंद्रीय परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी मंगळवारी राज्यसभेत दिली.2014 मध्ये मोसूलमधून या भारतीयांचे अपहरण झाले होते. दहशतवादी संघटना इसीसने या सर्व भारतीयांचे अपहरण त्यांना नंतर त्यांची हत्या केली. या भारतीयांना शोधण्यासाठी केंद्र सरकारने इराक सरकारची मदत मागितली होती. भारतीयांचे मृतदेह बगदादला पाठवण्यात आले असून, मृतदेह पडताळणीसाठी नातेवाईकांचे डीएनए सॅम्पल तेथे पाठविण्यात आले होते, पंजाब, हिमाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार यांचा या प्रक्रियेत समावेश होता. ‘जनरल व्ही के सिंग सर्व भारतीयांचे मृतदेह मायदेशी आणण्यासाठी इराकला जाणार आहेत. इराकहून मृतदेह घेऊन उड्डाण करणारे विमान आधी अमृतसरला, नंतर पाटणा आणि त्यानंतर कोलकाताला जाईल’, अशी माहिती स्वराज यांनी दिली. सुरुवातीला इराकमधून अपहरण झालेले भारतीय जिवंत असल्याचा दावा सरकारने केला होता. सुषमा स्वराज यांनी अपहृत भारतीयांच्या नातेवाईकांची स्वत: भेट घेतली होती. शिवाय 39 भारतीयांचा शोध घेण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करु, असे आश्वासनही त्यांनी दिले होते.2014 मध्ये इराकमधील मोसूल भागातून जून महिन्यात आयसिस या दहशतवादी संघटनेने 40 भारतीयांचे अपहरण केले होते. या 40 जणांपैकी एकटा हरजीत मसीहची सुखरुप सुटका झाली होती. मात्र या 39 भारतीयांबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नव्हती. तर दहशतवाद्यांनी माझ्यासमोर या 39 जणांना मारले, असा दावा या हरजीत मसीहने केला होता. अखेर या सगळ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत दिली.
इराकमध्ये 39 भारतीयांची हत्या ठोस पुराव्यानंतर सरकारकडून संसदेत घोषणा
Reviewed by Dainik Lokmanthan
on
08:18
Rating: 5