Breaking News

नीती आयोगाच्या 101 जिल्ह्याच्या रँकिगमध्ये महाराष्ट्रातील 4 जिल्हे उस्मानाबाद देशात तिसर्‍या स्थानावर

नवी दिल्ली : पायाभूत सुविधा, शिक्षण कृषी, कौशल्य विकास, आरोग्य, आर्थिक समावेशन आदी निकषांवर उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या देशातील 101 जिल्ह्यांची रँकिंग नीति आयोगाने जाहीर केली आहे. या क्रमवारीत महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश आहे. देशातील मागास जिल्ह्यात स्पर्धेचे वातावरण निर्माण करून विकासाला चालना देण्यासाठी विविध स्तरावर मागास असलेल्या 101 जिल्ह्यांची निवड महत्वाकांक्षी जिल्हे रूपांतरण या कार्यक्रमासाठी करण्यात आली होती. जानेवारी 2017 मध्ये या उपक्रमाची सुरुवात क रण्यात आली. भारत छोडो आंदोलनाच्या 75 व्या वर्धापन दिनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील सर्व जिल्हाधिकार्‍यांना व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित करताना, देशात विविध निकषांवर मागास असलेल्या 100 जिल्ह्यांची सामाजिक व आर्थिक परिस्थिती सुधारली तर देशाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळेल असे म्हटले होते. या अनुषंगाने नी ति आयोगाने ट्रान्सफॉरमिंग ऍस्पिरेशनल डिस्ट्रिक्टस हा उपक्रम सुरू केला.
केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे अभिसरण व या योजनांच्या अंमलबजावणीत प्रभारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांचा सहयोग आणि या योजना अंमलबजावणीचे रू पांतर स्पर्धात्मक व लोक चळवळीत करणे या धोरणातून महत्वाकांक्षी जिल्ह्यांची क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी देशातील 28 राज्यातील 115 जिल्ह्यांची निवड करण्यात आली होती. ही निवड करताना आर्थिक समावेशन, शिक्षण, आरोग्य व मूलभूत सुविधा हे निकष ठरविण्यात आले होते. नीति आयोगाने विविध निकषांवर उ ल्लेखनीय कार्य करणार्‍या 101 जिल्ह्यांची क्रमवारी जाहीर केली आहे यात महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा समावेश आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद हा जिल्हा तिसर्‍या स्थानावर आहे. वाशीम हा जिल्हा 11 व्या, गडचिरोली जिल्हा 14 व्या स्थानावर तर नंदूरबार 39 व्या स्थानावर आहे.