लाखो रुपयांची दुचाकी वाहने पडली अनेक वर्षांपासून धूळखात
या वाहनांचे लिलाव करणे गरजेचे असून प्रशासनाने या विषयाकडे त्वरित लक्ष घालावे अशी मागणी जोर धरत आहे. तरी वरिष्ठ स्तरावरून याप्रश्नी कुठलीही दखल घेतली जात नसून, प्रत्येक वेळी याकडे दूर्लक्ष करत असल्याचे निदर्शनास येत आहे.
आता तहसील कार्यालय प्रांगणात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर आशा वाहनाची संख्या वाढत असताना तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या समोरच या वाहनांचा खच पडलेला आहे. पोलीस ठाण्यासमोरील पुरवठा विभागाजवळील जागेत तसेच पोलीस कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या परंतु सध्या बंद अवस्थेतील वसाहतीच्या आवारात ही वाहने पडलेली आहे. तहसील कार्यालयात वाहन पार्किंग साठी असणाऱ्या जागेवर वाहने पडून असल्याने सरकारी कर्मचाऱ्यांची वाहने लावण्यासाठी अडचण निर्माण होत आहे. तसेच परिसरात या वाहनांमुळे अस्वच्छता देखील झाली आहे, तसेच या वाहनांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असून लिलावसाठी ठोस कारवाई करण्याची मागणी होत आहे.