Breaking News

रेल्वे-मेट्रो डब्यांची निर्मितीचा प्रकल्प मराठवाडयात रेल्वे आणि राज्य सरकारचा 600 कोटींचा करार

मुंबई : रेल्वे व राज्य सरकारच्या विभागात झालेल्या करारानुसार मराठवाडयात रेल्वे-मेट्रो डब्यांच्या निर्मितीचा प्रकल्प उभारण्यात येणार असल्याची माहिती मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ अंतर्गत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, रेल्वे डब्याच्या प्रकल्पामुळे लातूरमध्ये रेल्वे आणि मेट्रोसाठी डबे तयार होणार आहेत, ज्यामुळे तब्बल 15 हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे.


रेल्वे आणि राज्य सरकारचा एमआयडीसी विभागात 600 कोटींचा करार झाला आहे. मुंबईत झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही माहिती दिली. यावेळी रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि उद्योगमंत्री सुभाष देसाईही उपस्थित होते. लातूरमधल्या कोच बांधणी प्रकल्पात 15 हजार रोजगार उपलब्ध होणार आहेत. लातूर, बीड, परभणी या क्षेत्रात रेल्वे आणि मेट्रो कोच बांधणीसाठी वेंडर्सची इको सिस्टम उभारण्यात येणार आहे. त्यामुळे मराठवाडा हा ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’चा खरा लाभार्थी ठरणार आहे.

जानेवारी महिन्यात रेल्वेमंत्र्यांनी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. त्यानंतर फडणवीसांनी या प्रकल्पाबाबत घोषणा केली होती. लातूरचे पालकमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनी या प्रकल्पाचा पाठपुरावा केला होता. रिलायन्स, व्हर्जिन हायपरलूप, गृहनिर्माण आणि जेम्स-ज्वेलरी इंडस्ट्री यांच्यासोबतही सर्वात मोठे करार झाले. व्हर्जिन हायपरलूप टेक्ना ॅलॉजीची चाचणी केली आहे. फिजीबीलिटी रिपोर्टनुसार मुंबई-पुणे मार्ग सुचवण्यात आल्याचंही फडणवीसांनी सांगितलं. समृद्धी महामार्गासाठी 71 टक्के भूसंपादन झालेले आहे. समृद्धीसाठी एकही इंच जमीन परवानगीशिवाय घेतलेली नसल्याचा दावा, यावेळी मुख्यमंत्र्यांनी केला. रत्नागिरी रिफायनरीचा एमओयू मॅग्नेटिक महाराष्ट्रात झाला नाही, असे फडणवीसांनी सांगितले. चेंबूरमध्ये 40 वर्षांपासून रिफायनरी असून कुठलीच हानी झाली नाही. मी स्वतः उद्धव ठाकरे आणि ग्रामस्थांशी चर्चा केली. साधारणतः आम्ही कधीच क ोणावर प्रकल्प लादला नाही. आम्ही त्याचे फायदे लोकांना पटवून देण्याचे काम करत आहोत. आज नाणार रिफायनरीचा चजण झालेला नाही मात्र तो भविष्यात करु, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.