Breaking News

अपघातात तिघांचा मृत्यू

ठाणे : भिवंडी-वाडा रस्त्यावरील शेलार ग्रामपंचायत हद्दीतील बोरपाडा येथे झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला. असद नाशिर मिर्झा, शोहिद अन्सारी आणि समीर फारुक अन्सारी अशी मृतांची नावे आहेत. या घटनेतील सर्वात दु:खद गोष्ट म्हणजे मृतांमधील असदचे 25 जानेवारी तर शोहिदचे 30 जानेवारी रोजी लग्न होणार होते. 


रात्रीच्या सुमारास भिवंडीकडे परत येत असताना बोरपाडा येथे एका नागमोडी वळणावर समोरुन भरधाव आलेल्या कंटेनरने बुलेटला जोरदार धडक दिली. या धडकेत दोघे जागेवरच ठार झाले तर एकजण गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेत असताना त्याचा वाटेतच मृत्यू झाला. या अपघाताच्या घटनेनंतर अज्ञात कंटेनर चालक कंटेनरसह फरार झाला.