उत्तम वित्तीय व्यवस्थापनासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक-ज.र.मेनन
नाशिक, दि. 22, जानेवारी - शासनाच्या विविध विभागातील उत्तम वित्तीय व्यवस्थापनासाठी संगणकीय प्रणाली आणि नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग आवश्यक आहे, असे प्रतिपादन नवनियुक्त लेखा व कोषागरे संचालक ज.र.मेनन यांनी केले.जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन सभागृहात सहसंचालनालय लेखा व कोषागरे आणि महाराष्ट्र राज्य वित्त व लेखा सेवा राजपत्रित अधिकारी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित स्वागत समारंभात ते बोलत होते.
मेनन म्हणाले, शासनाचा प्रतिनिधी म्हणून इतर विभागात काम करताना वित्त विभागातील अधिकार्यांनी तेथील कामकाजाच्या गुणवत्तेकडे लक्ष देताना अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक विभागाचे वित्तीय व्यवस्थापन चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी नव्या संकल्पनांचा उपयेाग करावा. त्यादृष्टीने संगणकीय प्रणालीचा उपयोग महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.संचालक पदावर काम करताना कुटुंबप्रमुख या नात्याने भुमिका अदा करण्याचा प्रयत्न राहील असे सांगताना संचालक पदापर्यंतच्या प्रवासात अनेक चढउतार आल्याचे त्यांनी सां गितले. वित्त व लेखा सेवेतील अधिकारी-कर्मचार्यांचे प्रश्न सोडवून त्यांच्यावरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही ते म्हणाले.पिंपळखुटे यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या सेवेच्या कारकिर्दीत अनेक चांगली माणसे भेटल्याने चांगली कामगिरी करता आली, असे सांगितले. पूर्वी कामकाजात अनेक अडचणी असायच्या मात्र संगणकीकरणामुळे कामकाज अधिक गतिमान झाल्याचे त्यांनी सांगितले.
मेनन म्हणाले, शासनाचा प्रतिनिधी म्हणून इतर विभागात काम करताना वित्त विभागातील अधिकार्यांनी तेथील कामकाजाच्या गुणवत्तेकडे लक्ष देताना अडचणीतून मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक विभागाचे वित्तीय व्यवस्थापन चांगल्या दर्जाचे व्हावे यासाठी नव्या संकल्पनांचा उपयेाग करावा. त्यादृष्टीने संगणकीय प्रणालीचा उपयोग महत्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले.संचालक पदावर काम करताना कुटुंबप्रमुख या नात्याने भुमिका अदा करण्याचा प्रयत्न राहील असे सांगताना संचालक पदापर्यंतच्या प्रवासात अनेक चढउतार आल्याचे त्यांनी सां गितले. वित्त व लेखा सेवेतील अधिकारी-कर्मचार्यांचे प्रश्न सोडवून त्यांच्यावरील ताण कमी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल, असेही ते म्हणाले.पिंपळखुटे यांनी सत्काराला उत्तर देताना आपल्या सेवेच्या कारकिर्दीत अनेक चांगली माणसे भेटल्याने चांगली कामगिरी करता आली, असे सांगितले. पूर्वी कामकाजात अनेक अडचणी असायच्या मात्र संगणकीकरणामुळे कामकाज अधिक गतिमान झाल्याचे त्यांनी सांगितले.