Breaking News

तिसर्‍या टेस्टमध्येही भारताची दमदार सुरुवात


दिल्ली : श्रीलंकेविरुद्धच्या तिसर्‍या टेस्टमध्येही भारताने शनिवारी दमदार सुरूवात केली. पहिल्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतानं 4 विकेट गमावून 371 रन्स केल्या आहेत. दिवसाअखेरीस कॅप्टन विराट कोहली 156 रन्सवर नाबाद आणि रोहित शर्मा 6 रन्सवर नाबाद खेळत आहे. 

या मॅचमध्ये टॉस जिंकून भारतानं पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पण स्कोअरबोर्डवर 42 रन्स असताना शिखर धवन 23 रन्सवर आऊट झाला. तर त्यानंतर बॅटिंगला आलेल्या चेतेश्‍वर पुजारालाही 23 रन्सच बनवता आले. पण मुरली विजय आणि विराट कोहलीनं 283 रन्सची पार्टनरशीप केली. 

मुरली विजयनं 267 बॉल्समध्ये 155 रन्स केल्या. मुरली विजयचं टेस्ट क्रिकेटमधलं हे 11वं शतक आहे. तर विराट कोहलीनंही विजयपाठोपाठ शतक पूर्ण केलं. विराट कोहलीचं टेस्ट क्रिकेटमधलं हे 20 वं शतक आहे.