Breaking News

शहीद जवानांना मानवंदना

नवी दिल्ली : 1971 च्या भारत पाकिस्तान युद्धातील शहीद जवानांना आदरांजली वाहण्यात आली. यावेळी संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन, लष्करप्रमुख बिपीन रावत यांच्यासह लष्करातील उच्चपदस्थ अधिकारी यावेळी उपस्थित होते. 


देशभरात 16 डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशभरात शहिदांना आदरांजली वाहण्यात येते. या युद्धात पाकिस्तानची फाळणी झाली होती. तसेच पूर्व पाकिस्तानला बांगलादेश असे नाव देण्यात आले होते.