Breaking News

कारागृह हे शिक्षेचे नव्हे तर सुधार घडविण्याचे केंद्र - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस


जीवनात चूक झाल्यानंतर तीचे परिमार्जन करण्यासाठी शिक्षेची व्यवस्था करण्यात आली आहे. कारागृह हे कुणाला केवळ शिक्षा देण्यासाठी केलेली व्यवस्था नाही तर ते सुधार घडविण्याचे केंद्र आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
महाराष्ट्र कारागृह विभागाच्यावतीने स्व.वसंतराव देशपांडे सभागृहात दि. 15 डिसेंबर रोजी “तिमिरातून तेजाकडे” हा बंदिवानांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस मुख्य अतिथी म्हणून बोलत होते. नागपूरच्या महापौर नंदा जिचकार, गृह विभागाचे प्रधान सचिव श्रीकांत सिंह, अपर पोलीस महासंचालक डॉ.भुषणकुमार उपाध्याय, कारागृह उपमहानिरीक्षक योगेश देसाई यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती.