Breaking News

वर्ध्यात इंस्टाग्राम पोस्टवरुन मित्रानेच केली मित्राची हत्या !


इंस्टाग्राम पोस्टवरुन मित्रानेच मित्राची हत्या केल्याची घटना वर्ध्यात घडली आहे. या घटनेत मृतकासोबत असलेले तीन मित्रही जखमी झाले आहेत. समीर मेटांगळे असं मृत्यू झालेल्या तरुणाचं नाव आहे. मारेकऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
समीर मेटांगळेने दोन दिवसांपूर्वी इंस्टाग्रामवर एक पोस्ट टाकली होती. त्यावरून समीर आणि विभव गुप्तामध्ये वाद झाला. दोघेही बारावीच्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी आहेत. शिवाय एका खासगी ट्यूशन क्लासमध्ये ते सगळे एकत्र असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.