Breaking News

आंबा पीक नुकसान भरपाईचे सात कोटी रुपये प्राप्त

सिंधुदुर्गनगरी, दि. 16, डिसेंबर - काजू आणि आंबा पिकाकरिता विमा उतरविलेल्या सभासदांना नुकसान भरपाईचे 7 कोटी 17 लाख रुपये रक्कम बँकेला प्राप्त झाली आहे. फळपीक विमा 2016 अंतर्गत जिल्ह्यातील 2357 शेतकर्‍यांनी आंबा आणि काजू या फळपिकांचा विमा उतरवला होता. ही रक्कम 2054 शेतकरी सभासदांच्या बँक खात्यामध्ये जमा केली असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या वतीने देण्यात आली. 

अवेळी झालेला पाऊस आणि तापमानातील वाढीमुळे झालेल्या नुकसानीपोटी ही भरपाई देण्यात आली आहे. चालू वर्षातील आंबा पिकाचा विमा उतरवण्यासाठी विमा हफ्ता भरण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबरपर्यंत आहे. बागायतदारांनी आपल्या बागायती पिकांच्या संरक्षणासाठी फळपीक विमा योजनेत सहभागी व्हावे , यासाठी जिल्हा बँकांच्या शाखांमध्ये संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा बँकेने केले आहे.