Breaking News

महिला सुरक्षेसाठी आणखी प्रयत्न हवेत - केजरीवाल.

नवी दिल्ली : राजधानी दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या निर्भया बलात्कार प्रकरणानंतरही आतापर्यंत महिला सुरक्षेसाठीचे प्रयत्न अपुरे असल्याची खंत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी व्यक्त केली. संपूर्ण देशात खळबळ माजवणाऱ्या त्या घटनेनंतरही ठोस पावले न उचलले जाणे ही चिंतेची बाब आहे. 

मात्र, आपण एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी प्रयत्न वाढविण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. येत्या काळात दिल्ली सरकार राजधानीत विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविणार असल्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.