Breaking News

अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याने रहीवाशांचे आरोग्य धोक्यात.


शहरातील टाकळीमियाँ रोडवर असलेल्या भारतनगर वसाहतीत रोजच अस्वच्छ पाणी पुरवठा होत असल्याने येथील रहीवाशांचे आरोग्य धोक्यात आले आहे येथील सांडपाण्याचे मैलामिश्रीत पाणी पिण्याच्या पाईपलाईन मधे जात असल्याने तसेच वसाहतीलगत असलेल्या पाटचारीत दुधाच्या प्लँटमधील केमीकल मिश्रीत पाणी सोडण्यात येत असल्याने त्याचेही पर्क्युलेशन होवून हेही पाणी पाण्याच्या पाईपलाईनमधे घुसत असल्याचे भयानक चित्र आहे या सर्व परिस्थितीमुळे भारतनगर मधील रहीवाशांना साथजन्य आजाराची लागण होण्याची शक्यता रहीवाशांनी व्यक्त केली आहे
अस्वच्छ मैलामिश्रीत व रसायनयुक्त घाणपाणी पिण्याच्या पाईपलाईनमधे येत आहे याबाबत स्थानिक रहीवाशांनी नगरपरिषद प्रशासनास वारंवार सुचित करत तोंडी तक्रारी करुन पाण्याच्या बाबत लक्ष वेधले मात्र येथील गंभीर समस्या ना अधिकाऱ्यांना दिसत आहे ना पदाधिकार्यांना त्यामुळे येथील रहीवाशी आंदोलानाच्या पवित्र्यात आहेत. 

भारतनगर वसाहतीच्या संरक्षक भिंतीलगत शेजारच्या शेतातून पाटचारी गेलेली आहे या पाटचारीत शहरातील एका दुधव्यावसायीकाच्या दुधप्लँटमधील रसायनाचे पाणी पाटचारीत सोडले जात आहे याचाही दुष्परिणाम होवून हे रसायनाचे घाणपाणी वसाहतीत असलेल्या पिण्याच्या पाईपलाईन मधे जात आहे या सर्वाचा परिणाम दूषीत व रसायनयुक्त पाण्यात होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलेले आहे. 

या गंभीर समस्येबाबत नगरपरिषद पाणीपुरवठा व आरोग्य विभाग यांनी त्वरित दखल घेवून लक्ष देत या समस्येचे निराकारण करत नागरिकांना स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी त्वरित पाऊले उचलण्याची मागणी स्थानिक रहीवाशांनी केली आहे तसेच पाटचारीत होत असलेले रसायनयुक्त घाणपाणीही संबंधित व्यक्तीस सुचित करुन थांबविण्यात यावे अशी मागणी करुन वसाहतीत अंतर्गत गटारी व सांडपाण्याच्या सुविधा नगरपरिषदेने द्यायला हव्यात अशीही मागणी होते आहे.