Breaking News

रहाणे तिसर्‍या क्रमांकाचा सलामीवीर : विराट कोहली

मुंबई, दि. 22, ऑक्टोबर - दमदार फॉर्मात असणारा अजिंक्य रहाणे टीम इंडियाचा तिसरा सलामीवीर फलंदाज आहे, असं कर्णधार विराट कोहलीने स्पष्ट  केलं. त्यामुळे न्यूझीलंविरुद्धच्या तीन सामन्यांमध्ये त्याला सलामीला उतरवलं जाणार नसल्याचं जवळपास स्पष्ट झालं आहे. शिखर धवन आणि रोहित शर्मा  टीम इंडियाचे नियमित सलामीवीर फलंदाज आहेत. शिखर धवनच्या अनुपस्थितीत दिलेल्या संधीचा फायदा घेत अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वन  डे मालिकेत चार अर्धशतकं ठोकले. या मालिकेत भारताने 4-1 ने विजय नोंदवला होता.
रहाणेने तिसर्‍या क्रमांकाचा सलामीवीर फलंदाज म्हणून मिळालेल्या सर्व संधींचा फायदा घेतला आहे. केएल राहुलही सलामीवीर फलंदाजांच्या स्पर्धेत आहे.  मात्र अजिंक्य रहाणेने संधीचा फायदा घेत चांगली कामगिरी केली, असं विराटने सांगितलं. न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या वन डेच्या पूर्वसंध्येला बोलताना  विराटने अनेक विषयांवरील प्रश्‍नांना उत्तरं दिली. 22 ऑक्टोबरपासून न्यूझीलंडविरुद्धच्या वन डे मालिकेला सुरुवात होत आहे. मुंबईतील वानखेडे  स्टेडिअमवर पहिला सामना खेळवला जाणार आहे.