Breaking News

तो माझा शेवटचा सामना असेल: आर. अश्‍विन

मुंबई, दि. 22, ऑक्टोबर - टीम इंडियाचा स्टार फिरकीपटू आर अश्‍विनने  मोठा निर्णय जाहीर केला आहे. अश्‍विनने आपल्याला कधीपर्यंत आंतरराष्ट्रीय  क्रिकेट खेळायचं आहे, कधी निवृत्ती घेणार, याबाबतची घोषणा केली आहे.
अश्‍विनने अद्याप निश्‍चित तारीख जाहीर केली नाही, पण कसोटी क्रिकेटमध्ये 618 विकेट घेतल्यानंतर निवृत्ती घेईन, असं अश्‍विनने सांगितलं. भारताकडून  कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या (619) नावावर आहे. अश्‍विनसाठी कुंबळे हा आयडॉल आहे. त्यामुळे कुंबळेच्या  पुढे न जाता त्याचे मागे म्हणजेच 618 विकेट जेव्हा घेईन, तो माझा शेवटचा कसोटी सामना असेल, असं अश्‍विन म्हणाला.